मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते.
किरण हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या ते त्यांच्या राजकीय भूमिका देखील सोशल मीडियावर मांडत आहेत. याच कारणामुळे किरण यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आले आहे. पण किरण यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.
यानंतर किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर आता राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन किरण माने यांना मालिकेतून काढल्याचा निषेध करत हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल, असे म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी;याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल. pic.twitter.com/nqfHfxJhJq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 14, 2022