मुंबई : राज्यामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाआघाडी सरकार स्थापन केल्यानंतर आज तब्ब्ल महिनाभराने महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला आहे. राज्यामध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच परस्पर विरोधी विचारसरणी असलेले शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गुण्यागोविंदाने नांदतील का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशातच मंत्रिमंडळ विस्तारास झालेल्या विलंबामुळे देखील महाआघाडीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचेच संकेत मिळत होते मात्र आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे हे सर्व प्रश्न मागे पडले असून महाआघाडी सरकार आता राजकारभाराचा गाडा ओढण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज झाले आहे.
दरम्यान, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन करत राज्याला पुन्हा प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी महाआघाडीचे सर्व नवनिर्वाचित मंत्री प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यामध्ये महाआघाडीच्या सरकार स्थापन झाल्यापासूनच नव्या मंत्रिमंडळामध्ये ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आदित्य ठाकरे व शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना स्थान मिळणार असल्याचं नक्की मानलं जात होत. मात्र आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदित्य ठाकरेंना स्थान मिळालं परंतु रोहित पवार यांना स्थान मिळू शकले नाही.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या सर्व मंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन.
मला पूर्ण विश्वास आहे की राज्याला पुन्हा प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील रहाल! pic.twitter.com/JgNmWZLUXp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 30, 2019
@AjitPawarSpeaks @AshokChavanINC @dhananjay_munde @nawabmalikncp @Dwalsepatil @Awhadspeaks @rajeshtope11 @VijayWadettiwar @anilparab @AUThackeray @GulabraojiPatil
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 30, 2019