मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सचिन वाझे प्रकरण, परमवीर सिंह यांचे आरोप, फोन टॅपिंग आणि त्यासंदर्भातील अहवाल यावरून गदारोळ सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी पोलीस फोन टॅपिंगसंदर्भातील अहवाल सादर केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. त्या टीकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. मात्र, हा अहवाल कुंटे यांनी तयार केला नसावा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर आता रोहित पवार रोहित पवार यांनी दोन ट्विट करत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचे काही अनुभवी नेत्याचं म्हणणे आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का,असा प्रश्न मला पडला. पण महाविकास आघाडी सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही ‘अनुभवी’ नेत्याचं म्हणणं आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का,असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 27, 2021
मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. मविआ सरकारला बदनाम करण्यासाठीच ‘फोन टॅपिंग’चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, रोहित पवार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं.