राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा मंगळवारी अहमदनगरमध्ये अहमदनगर 25 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉलेजच्या मैदानावर वर्धापन दिन साजरा केला.
यावेळी जयंत पाटील सूचक विधान केले ते म्हणाले, मी आणखी ४ महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन. नोव्हेंबरनंतर पदावर नसणार ‘ असे असं म्हणत त्यांनी भाषण केले. दरम्यान जयंत पाटील यांच्या सूचक विधानावर आता सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे.
मागच्या वर्षी पक्षाच्या वर्धापन दिनी अजित दादा पवार यांनी विरोधी पक्षनेते सोडून पक्षाची जबाबदारी मागितली होती परंतु त्यांना ती दिली नाही.ज्या ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्या त्या वेळी जयंत पाटील यांनी ती वेळ मारून नेली काल अहमदनगरच्या सभेत सुद्धा त्यांनी वेळ मारून…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) June 11, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपल्या X अकाउंटवरून एक पोस्ट केली. पोस्टमध्ये ते नेमकं काय म्हणाले…
‘मागच्या वर्षी पक्षाच्या वर्धापन दिनी अजित दादा पवार यांनी विरोधी पक्षनेते सोडून पक्षाची जबाबदारी मागितली होती परंतु त्यांना ती दिली नाही.ज्या ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्या त्या वेळी जयंत पाटील यांनी ती वेळ मारून नेली काल अहमदनगरच्या सभेत सुद्धा त्यांनी वेळ मारून नेली.विधानसभेपर्यंत प्रदेश अध्यक्ष पद राहू द्यावं असं जाहीर भाषणात म्हणाले..तिथे अनेक लोकांची इच्छा आहे जयंत पाटील साहेब गट वाढवण्याला महत्व देतात पक्ष वाढवणाऱ्या एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळावी.परंतु त्यांनी परत वेळ मारून नेली. अनेक दिवसापासून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत कंटाळून अजित दादा सारखा निर्णय घेतील.’ असा दावाही त्यांनी केला आहे.