मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसाच्या सभेला रविवारी (१८ ऑक्टोबर) एक वर्ष पूर्ण होत आहे .
शरद पवारांच्या पावसातील सभेची आज वर्षपूर्ती
महाराष्ट्रातील या सत्ताबदलाची व पवारांच्या साताऱ्याच्या पावसातील सभेची देशभर चर्चा झाली . याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहून राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका केलीय.
आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नावरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा….. https://t.co/EiJtR0Ekra pic.twitter.com/NZafQTAaMl
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 18, 2020
काय म्हणाले रोहित पवार
”आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा. काही घटनाक्रम हे मनःपटलावर कायमचे कोरले जात असतात. त्यातील ही एक महत्वाची घटना आहे.”
सुप्रिया सुळेंनी शेअर केला शरद पवारांच्या पावसातील सभेचा फोटो; म्हणाल्या…
दरम्यान, आपल्या फेसबुक पोस्टमधून रोहित पवारांनी, पडत्या काळात राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यांवर कडक शब्दात टीका केलीय.