मुंबई -ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी देशात दोन कर्णधारांबाबत चर्चा सुरू होती. कोहलीला कसोटी आणि रोहितला मर्यादित षटकांचा कर्णधार बनवले जावे. मात्र, मालिकेनंतर नवे नाव अजिंक्य रहाणेचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे यात कोहलीचे नावच नाही. रहाणेला कसोटीचा आणि रोहितला एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार बनवण्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या दशकात वेगवेगळे कर्णधार असलेले संघ अधिक यशस्वी ठरले. ऑस्ट्रेलिया व विंडीजमध्ये मर्यादित षटक व कसोटी संघाचे कर्णधार वेगवेगळे आहेत. ऑस्ट्रेलियाने 2015 व 2019 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि विंडीजने 2012 व 2016 ची टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली. भारतातही तशीच स्थिती असावी का, यावर जेव्हा बीसीसीआयच्या सदस्यांनी तसेच काही परदेशी खेळाडूंनीही आपली मते व्यक्त केली आहेत.
विराट कोहलीमुळे संघाला विजयाची सवय लागली. त्यामुळे त्याच्याकडील नेतृत्व हे कायम राहावे. यातील बदलाचा फटका संघाला बसू शकेल, अशी प्रतिक्रिया माजी खेळाडू मदनलाल यांनी दिली.
रहाणेच्या नेतृत्वाबद्दल म्हटले की, रहाणे निर्भीड व चतूर आहे. ते त्याच्यासाठी खूप आहे. कठीण काळात तो शांत राहतो. त्याला सहकाऱ्यांकडून सन्मान मिळतो. हा त्याच्या नेतृत्वातील सर्वात मोठा गुण आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी म्हटले आहे.