जिनिव्हा – रोहिंग्यांच्या संकटावर त्वरित तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने एक ठराव मंजूर केला आहे. इस्लामिक देशांचे संघटन आणि युरोपियन संघाने मांडलेला हा ठराव बुधवारी मंजूर करण्यात आला. या ठरावाच्या बाजूने 132 तर विरोधात 9 मते पडली.
यावर्षी या ठरावात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातील तात्पुरते आदेश आणि रोहिंग्या व इतर अल्पसंख्यांकांच्या हक्कमुक्तीचा मुद्दा यासारख्या काही नवीन घडामोडी लक्षात घेतल्या गेल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्र संघात बांगलादेशच्या कायम प्रतिनिधींनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या रोहिंग्यांच्या संकटाचे मूळ कारण शोधून काढून त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात. रोहिंग्या नागरिकांना नागरिकत्व देण्यात यावे आणि अनुकूल वातावरण निर्माण करुन त्यांच्या घरी सुरक्षित निश्चित हमी देऊन परत आणता यावे यासारख्या उपाययोजना करण्यासाठी म्यानमारच्या बाजूने विशिष्ट कारवाई करण्याची मागणी या ठरावात करण्यात आली आहे.
विस्थापित रोहिंग्यांना आश्रय देण्याच्या मानवतावादी कृत्याबद्दल बांगलादेश सरकारचे या ठरावात कौतुक केले गेले आहे. बांगलादेशच्या मानवतावादी कृत्यात पाठिंबा देण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्राने इतर देशांना केले आहे.