सातारा – शहरातील भरवस्तीत असणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानावर सहा दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दरोडा टाकला. ही घटना सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली असून, दरोडेखोरांनी 28 हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी राहुल हरी कोरे (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सदाशिव पेठेमध्ये राधाकृष्ण ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्र हातात घेऊन दुकानासमोर आले. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण गोडसे यांना मारहाण करत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दुकानातील सुमारे 28 हजार रुपये किमतीचा सोन्याचांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी गतीने सुरू केले आहे. दरोडेखोर शहरातून बाहेर गेले नसावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्रभर नाकाबंदी सुरू असल्यामुळे जमा न झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. गतवर्षी झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त वाचून दाखवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वजन- मापांची (काटा) तपासणीसाठी तहसीलदारांच्या अंर्तगत समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती रामदास शिंदे यांनी दिली.
यंदाच्या वर्षी एफआरपी प्लस पाचशे रुपये दर देण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली. साताऱ्यात रिकव्हरीचा दर चांगला असताना एफआरपीचा दर का मिळत नाही, गतवर्षीची तब्बल 53 कोटी थकबाकी आह, प्रशासन केवळ बैठकांचे आयोजन करते, ठोस अंमलबजावणी करत नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेळके यांनी केला.