India legends : रोड सेफ्टी टी-२० वर्ल्ड सीरिजच्या ( Road Safety T20 World Series ) पहिल्या उपांत्य सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने ( India legends ) ऑस्ट्रेलिया लीजेंड्स संघाचा ५ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया लिजेंड्सने १७१-५ अशी धावसंख्या उभारली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंडिया लिजेंड्सने ५ गडी राखून सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजेंड्स ( India legends ) संघाला नमन ओझाने चांगली सुरुवात करून दिली. तर दुसऱ्या बाजूने सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना स्वस्तात बाद झाले. यानंतर ओझा आणि युवराज सिंग यांनी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. मात्र, युवराज बाद झाल्यानंतर स्टुअर्ट बिन्नी आणि युसूफ पठाण हेही फ्लॉप ठरले.
शेवटच्या दोन षटकात भारताला विजयासाठी २४ धावांची गरज होती. इरफान पठाणने १९ व्या षटकात तीन चेंडूंवर तीन षटकार मारले आणि नंतर शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचून इंडिया लिजेंड्सला ( India legends ) ५ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. इरफान पठाणने दमदार फलंदाजी करत १२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३७ धावांची तुफानी खेळी केली. ( Road Safety T20 World Series India Iegends vs Australia legends semifinal match )
इंडिया लिजेंड्सकडून ( India legends ) नमन ओझाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६२ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ९० धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियन संघाकडून शेन वॉटसनने सर्वाधिक दोन बळी घेतले.