पुणे – कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी, उन्हाच्या तीव्रतेत देखील वाढ होत आहे. त्यामुळे दुपारी कडक उन आणि रात्री उकाडा असे वातावरण असल्याने, मार्चच्या पहिल्याच्या आठवड्यात नागरिक उन्हामुळे त्रस्त झाले आहेत.
यासह नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, सनकोट, टोपी आदींचा वापर करत असल्याचे चित्र आहे.
विदर्भाच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर कोकण गोव्याच्या बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे.