जसा समाज तसा चित्रपट असतो, असे दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांनी म्हटले आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिंबिब आपल्याला चित्रपटातून पाहावयास मिळतात. कधी सत्य कथानकावर आधारलेल्या चित्रपटातून तर कधी सभोवताली घडणाऱ्या रंजक घटनांवर. मुंबईवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला असो, प्रेमाच्या त्रिकोणावर आधारलेला “रुस्तुम’ असो किंवा महिला हॉकीची दुर्दशा सांगणारा शाहरुख खानचा “चक दे इंडिया’ असो, अशा विषयाची श्रोत्यांना नेहमीच भूरळ पडली आहे. निव्वळ रोमॅंटिक, विनोदी चित्रपटांना तिकीटबारीवर फारसे यश मिळत नसल्याचे पाहून निर्माते अनोख्या विषयांना हात घालत आहेत. हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
बॉलिवूडमध्ये अनेक विषयांवर चित्रपट बनतात. मात्र, सध्याच्या काळात हटके विषयांना प्राधान्य दिले जात आहे आणि श्रोत्यांनाही ते विषय भावत आहेत. मग खेळ असो, देशभक्ती असो किंवा चालू घडामोडीवरील एखादा विषय असो. आजकाल श्रोत्यांची पसंती पाहूनच चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. निर्मात्यांनीही श्रोत्यांची नाडी ओळखली असून त्यानुसार पारंपरिक मसाला आणि विनोदाऐवजी वेगळ्या धाटणीचे विषय निवडले जात आहेत. वास्तविक जसा समाज तसा चित्रपट असतो, असे दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांनी म्हटले आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिंबिब आपल्याला चित्रपटातून पाहावयास मिळतात. कधी सत्य कथानकावर आधारलेल्या चित्रपटातून तर कधी सभोवताली घडणाऱ्या रंजक घटनांवर. मुंबईवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला असो, प्रेमाच्या त्रिकोणावर आधारलेला “रुस्तुम’ असो किंवा महिला हॉकीची दुर्दशा सांगणारा शाहरुख खानचा “चक दे इंडिया’ असो. या विषयाची श्रोत्यांना नेहमीच भूरळ पडली आहे. निव्वळ रोमॅटिक, विनोदी चित्रपटांना तिकीटबारीवर फारसे यश मिळत नसल्याचे पाहून निर्माते अनोख्या विषयांना हात घालत आहेत. “मिशन मंगल’ हा त्याचाच परिपाक आहे. “बाहुबली’, “रोबो’ हे सर्व हटके विषय श्रोत्यांनी हिट केले. हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
असीम चक्रवर्तींची निर्मिती
गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये नावीन्यपूर्ण कथानकावर चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. लवकरच प्रदर्शित होणारा “वाली बाला’, “उजडे चमन’ या चित्रपटाचे उदाहरण देता येईल. याच रांगेत आता अनेक चित्रपट आहेत. जसे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला “ड्रिमगर्ल’वरून श्रोते कमालीचे उत्सुक होते. वास्तविक कथानक अत्यंत साधारण होते, एक बेकार युवक केवळ आपली बेरोजगारी दूर करण्यासाठी कॉल सेंटरवर मुलीचा आवाज काढून पुरुषांचे मनोरंजन करत असतो. ही भूमिका करणारा आयुष्यमान खुराणा यांच्या मते, हा विषय थोडा हटके आणि बोल्ड आहे. त्यामुळे श्रोत्यांनाही चित्रपटाला पसंती दिली. तसे पाहिले तर आयुष्यमानसाठी ही गोष्ट नवीन नाही. त्याने यापूर्वीही वेगळे चित्रपट केले आहेत. “विकी डोनर’, “बधाई हो’ यासारख्या चित्रपटात आयुष्मानने काम करुन श्रोत्यांची मने जिंकली. जुन्या चित्रपटाचा उल्लेख केल्यास “टॉयलेट एक प्रेमकथा’, “पॅडमॅन’, “गोल्ड’, “हिंदी मीडियम’, “लखनौ सेंट्रल’, “बेगम जान’, स्त्री, “बधाई हो’ चा समावेश करावा लागेल. या चित्रपटांनी निर्मिती अवस्थेतच लोकांची मने जिंकली. एखादा चित्रपट वगळता अन्य चित्रपटांनी श्रोत्यांची निराशा केली नाही.
“बधाई हो’ची क्रेझ
“बधाई हो’ ची चर्चा केल्यास त्याच्या प्रोमोवरून दर्शकांत जबरस्त क्रेझ निर्माण झाली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेला उतरला. चित्रपटाचे कथानक सर्वश्रूत आहे. चांगली पटकथा आणि कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर वीस कोटींच्या चित्रपटाने 175 कोटींचा गल्ला जमवला.
“टॉयलेट एक प्रेम कथा’
अक्षय कुमारचा “टॉयलेट एक प्रेमकथा’ ही सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत कॉमेडी ट्रॅकवर चालते. त्याचा विषय खूपच वेगळा होता. हा विषय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरित होता. हा चित्रपट ग्रामीण भागातील शौचालयाच्या स्थितीवर अवलंबून होता. अनेक रंजक प्रसंग यात होते. ग्रामीण भागाशी नाळ जोडणारा हा चित्रपट असल्याने सर्वच ठिकाणी या चित्रपटाचा बोलबाला झाला.
“पॅडमॅन’ची बोल्ड कथा
दिग्दर्शक आर. बाल्की यांचा “पॅडमॅन’ हा चित्रपट बोल्ड विषयामुळे चर्चेत राहिला. ही एक अरुणाचलम मुरुगंथम नावाच्या व्यक्तीची कहाणी आहे. पडद्यावर हे पात्र अक्षयकुमार याने साकारले. अरुणाचलम हा असा व्यक्ती असतो की तो ग्रामीण भारतातील महिलांसाठी सॅनेटरी पॅडची निर्मिती करतो. कमी बजेटमध्ये पॅड मशिनची निर्मिती केली. हीच बाब श्रोत्यांना भावली. हीच बाब चित्रपटाला हिट होण्यासाठी पूरक ठरली.
गोल्ड की खरे सोने
काही जण मान सन्मानाला खरे सोने मानतात. जर हाच सन्मान देशासाठी मिळवला तरी ती गर्वाची बाब ठरते. भारताने कोणत्याही खेळात कितीही यश मिळवले तरी चर्चा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाचीच होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिले पदक हॉकी संघानेच भारताला मिळवून दिले होते. चुकीचे सादरीकरण आणि कमकुवत पटकथा यामुळे “गोल्ड’चा बोलबाला झाला नाही. एक चांगला विषय बेकार पटकथेमुळे आपटला.
गुलशनकुमारवर मुगल
गुलशनकुमार यांच्यावरील “मुगल’ हा चित्रपट कधी तयार होईल आणि कधी प्रदर्शित होईल हे आताच सांगू शकत नाही. या चित्रपटाबाबत फारसे सांगण्याची गरज नाही. टी सिरिजचे निर्माते भूषण कुमार आणि किशनकुमार चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाची दिशा अजूनही ठरलेली नाही.
हिंदुस्थानचे ठग
हिंदुस्थानच्या ठगाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अभिनेता आमीर खानने “ठग्स ऑफ हिंदुस्थान’ चित्रपट काढून नवीन जोखीम पत्करली होती. त्यात त्याचे हात चांगलेच भाजले. या चित्रपटाचा निर्माता आदित्यराज चोप्राला या रंजक विषयाला कॅश करता आले नाही.
आठवण “चेतना’ चित्रपटाची
1970 मध्ये बी. आर. इशारा यांचा चित्रपट “चेतना’ हा ज्येष्ठ नागरिक कदाचित विसरू शकतील. या चित्रपटातील एकमेव लोकप्रिय गीत “मै तो हर मोड पर तुझको दूंगा सदा’ हे ऐकताच “चेतना’मधील काही गोष्टी आठवतात. तत्कालीन काळात हा चित्रपट खूपच बोल्ड होता. आजच्या काळात नायक-नायिका यांचे चुंबन दृष्य साधारण बाब झाले आहेत. मात्र चार दशकांपूर्वी हे दाखविण्याचे धाडस “चेतना’तून केले गेले. आजच्या काळात चेतना पाहिला तर त्यातील एकही बोल्ड सिन वाटणार नाही. मात्र, निर्मात्यांनी तत्कालीन काळात पोस्टरवर या बोल्डनेसचा भरपूर वापर केला.
“गाईड’ला कसे विसरता येईल?
देवानंद यांचा “गाइड’मध्ये हाताळलेला वेगळा विषय श्रोत्यांना चांगलाच भावला. या चित्रपटाचे रिमेक करण्याचा अनेकदा विचार आला. मात्र, तो पूर्णत्वास येऊ शकला नाही. राजू गाइड हा नायिका रोझीला फसवतो. रोझी ही आपल्या नृत्याच्या प्रेमात पडलेल्या राजू गाइडचा वापर करते आणि रोझीचा पती मार्के म्हणजेच किशोर शाहू हा आपल्या पत्नीवर अत्याचार करत असतो. तीन नकारात्मक पात्र हाताळून चित्रपट तयार करणे ही साधारण बाब नाही.
सत्य कटू असते
एकूणात बोल्ड आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात कटू सत्य लपलेले असते. अशा प्रकारचे चित्रपट तयार करणे ही साधारण बाब नाही. अभिनेता संजय दत्तचे जीवन खूपच वादग्रस्त राहिले. मात्र, निर्माते राजकुमार हिरानी यांनी प्रामाणिकपणे बायोपिक करूनही संजय दत्तशी संबंधित वाद पूर्णपणे बाहेर काढता आले नाही. हा चित्रपट आणखी योग्य रितीने हाताळला असता तर बॉलिवूडच्या इतिहासात त्याची नोंद झाली असती.
अक्षय आघाडीवर
चार पाच वर्षापूर्वी अक्षयकुमारने एका मुलाखतीत म्हटले की, आपले लक्ष्य कमर्शियल आणि ऑफ बिटकडे राहिल. वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यावर त्याचा भर राहिल, असे संकेत त्याने दिले होते. त्यामुळे त्यांनी वेगळ्या विषयाचे चित्रपट निवडले आणि यशस्वी देखील झाले. एअरलिफ्ट, केसरी, लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल.
सोनम परब