Rishabh Pant : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची सध्या वाईट वेळ सुरु आहे. असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही, कारण जेव्हापासून दिनेश कार्तिकने दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे, तेव्हापासून ऋषभ पंतला ( Rishabh Pant ) कमी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. पंतला एखाद्या मालिकेसाठी संघात निवडले जाते मात्र त्याला सामन्यावेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळत नाही. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा आणि निवडकर्त्यांकडून ऋषभपेक्षा अनुभवी दिनेश कार्तिकवर जास्त भरवसा दाखवला जात आहे. दिनेश कार्तिकला टीम इंडियाचा फिनिशर मानले जात आहे. तर ऋषभला मिळालेल्या संधींचा फायदा घेता आलेला नाही.
ऋषभ पंतसोबत ( Rishabh Pant ) अशा प्रकारच्या वागणुकीमुळे त्याचे चाहते कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडवर चांगलेच भडकले आहेत. त्याचबरोबर पंतला सातत्याने संघात खेळवण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान पंतचे सहकारी खेळाडू त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. ( Rishabh Pant is getting abusive behavior from Team players ) सोशल मीडियावर याबाबत काही वापरकर्त्यांनी फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये त्याचे सहकारी खेळाडू त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
बुधवारपासून भारताची दक्षिण आफ्रिकेविरुध्द ( India vs South Africa ) टी-२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी ऋषभ पंतला ( Rishabh Pant ) संघात स्थान देण्यात आलेले आहे. मात्र दिनेश कार्तिकच्या हजेरीत त्याला किती सामन्यात खेळवले जाईल किंवा खेळवले जाणारच नाही याबाबत अजूनही शंकाच आहे. त्याचबरोबर ऋषभला पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी मुख्य संघात स्थान देण्यात आलेले आहे. तरीही प्रश्न तोच आहे आहे की संघात स्थान तर दिले जाते मात्र खेळायला संधीच देत नाहीत.
पंतच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने देशासाठी ११७ सामने खेळताना १२८ डावात ३८९७ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पंतने ३१ सामन्यांच्या ५३ डावांमध्ये ४३.३ च्या सरासरीने २१२३ धावा केल्या आहेत. २७ एकदिवसीय सामन्यांच्या २४ डावांमध्ये ३६.५ च्या सरासरीने ८४० आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ५१ डावांमध्ये २३.९ च्या सरासरीने ९३४ धावा केल्या आहेत.