तुषार गांधींची केंद्र सरकारवर कडाडून टीका
नवी दिल्ली : देशात सध्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. देशातील बहुतांश भागात या कायद्याला विरोध होत आहे. दरम्यान, देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा टुकडे-टुकडे गॅंग चा उल्लेख होऊ लागला आहे. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून सध्या केंद्रात टुकडे-टुकडे गॅंग सत्तेत आहे असा टोला लगावला आहे.
The Tukde Tukde Gang is currently in power at the Centre.
— Tushar (@TusharG) December 27, 2019
तुषार गांधी यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. यामध्ये त्यांनी टुकडे टुकडे गॅंग सध्या केंद्रात सत्तेत आहे असे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर तुषार गांधी यांनी ही टीका केली आहे. अमित शाह यांनी टुकडे-टुकडे गॅंगला अद्दल घडवा असे आवाहन केले होते.
अमित शाह यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना टुकडे-टुकडे गॅंगला अद्दल घडवा असे आवाहन दिल्लीतील जनतेला केले होते. त्यांनी म्हटले होते की, कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील टुकडे-टुकडे गॅंग दिल्लीत अशांतता पसरवत असून, तिला अद्दल घडवा. असे अमित शहा यांनी म्हटले होते. त्यालाच आज तुषार गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.