भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पुण्यातील पाच बाईक रायडर तरुणांनी देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना अनोखी मानवंदना देण्याचं ठरवलं आहे. या उपक्रमाद्वारे हे तरुण भारताची सर्वात पश्चिमेची समुद्री सीमा म्हणजेच नारायण सरोवर येथील कोटेश्वर मंदिर पासून भारताची सर्वात पूर्वीची सीमा म्हणजेच काहो, अरुणाचल प्रदेशपर्यंत बाईकवर प्रवास करणार आहेत.
विशेष म्हणजे, हे लांब पल्ल्याचं अंतर जुन्या काळातील येजडी (YEZDI) व जावा (JAWA) या 1968 ते 1985 सालामधील गाड्यांवर प्रवास करून पूर्ण करणार आहेत.
पुण्यातून संदीप कटके, राहुल मोकाशी, वैभव रहाटे, राहुल हंकारे व महेंद्र शेवाळे यांनी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रवास सुरू केला असून 14 नोव्हेंबर रोजी हे सर्वजण नारायण सरोवर येथे पोहोचले.
रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी या सर्वांनी पश्चिम भारत ते पूर्व भारत मोहिम कोटेश्वर मंदिर नारायण सरोवर पासुन सुरू केली असून आज दुपारी हे सर्व रायडर्स आयोध्या येथे पोहोचले आहेत व त्या ठिकाणी या सर्वांचे स्थानिकांकडून स्वागत केले गेले.