सांगली – कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावल्यानंतर माजी गृहमंत्री कै. आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रावादी युवक कॉंग्रेसची सूत्रे देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याबाबतचे संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतना दिले.
शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे, एकनाथ खडसेंसारख्या नदिग्गज नेत्यांना त्यांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले. त्यावेळी रोहित पाटील यांना जोमदार यश मिळवले. त्यामुळे या यशाला मॅटे मोल प्राप्त झाले आहे.
रोहित पाटील पक्षात महत्वाची जबाबदारी देणार का? असे विचारता जयंत पाटील म्हणाले, सगळ्या चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या पक्षात नेहमी होते, त्यामुळे काही अडचण नाही. शेवटी पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने नेतृत्व केले पाहिजे हा विचार आमच्या पक्षात मुळापासूनच आहे.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा उद्धव ठाकरेंनी पूर्ण करून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्र कधीच विसरणार नाही अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचे खासदार पाटील व शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन शेतकरी विकास आघाडीच्या झेंड्याखाली पॅनेल मैदानात उतरवले होते. जागावाटपात आबा गटाची कोंडी करून देईल त्या जागा मान्य करीत आघाडी करण्याची तयारी दर्शवली. मात्र, रोहित पाटील यांनी अवमानकारक तडजोडीला नकार देत राष्ट्रवादीच्या चिन्हावर पॅनेल मैदानात उतरवले. लोकांनीही या नवख्या नेतृत्वाला साथ देत तब्बल 10 जागा देत आबा गटावर विश्वास दर्शवला. घोरपडे-सगरे-खासदार गटाला सत्तेपासून दूर ठेवत बदलत्या राजकारणाची दिशाही निश्चित केली.