जामखेड -जामखेड हा दुष्काळी भाग आहे. येथील विंचरणा नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याने निश्चितच जामखेडच्या वैभवात भर पडणार आहे, असे प्रतिपादन बारामती अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
विंचरणा नदीतील गाळ काढून सुशोभीकरणाच्या कामाच्या प्रारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून विंचरणा नदी गाळमुक्त व सुशोभीकरण कामास प्रारंभ करण्यात आला. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गाळ व कचरा काढणे, दुसऱ्या टप्प्यात रस्ता व झाडांची लागवड व तिसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, सा. बां. विभागाचे उपअभियंता संजय कांबळे, अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, उद्योजक रमेश आजबे, दादासाहेब ढवळे, उमर कुरेशी, प्रशांत राळेभात, राजेंद्र गोरे, सुनील कोठारी, रवी शेळके, तात्याराम पोकळे, प्रकाश काळे, हरिभाऊ आजबे, ऋषी कुंजीर, काकासाहेब कोल्हे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.