नवी दिल्ली – भारतातील जेट एअरवेज कंपनीची 123 पैकी बहुतांश विमाने कार्यरत नाहीत. त्यामुळे एकूणच नागरी विमान उड्डयन क्षेत्रावर परिणाम झालेला आहे. त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या क्षेत्राच्या कामकाजाचा एकूणच आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
विमानांची संख्या कमी झाल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विमानाच्या भाड्यात वाढ झाली आहे. एवढेच नाही तर जेट एअरवेजच नाही तर इतर कंपन्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या घडामोडीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे यातून शक्य तितक्या लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू असल्याचे प्रभू यांनी सूचित केल.
त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक सचिव प्रदीप सिंग यांना याबाबत अधिक माहिती मिळविण्यास सांगितले आहे. पंतप्रधान कार्यालयानेही परवा यासंबंधात नागरी विमान वाहतूक विभागाला सूचना दिल्या आहेत व परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे.