नवी दिल्ली – जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच राज्यासंबंधी गृहमंत्र्यांकडे अहवाल सोपवला आहे. राज्यात सध्या काय स्थिती आहे, कुठली विकासकामे सुरू आहेत याची माहिती अहवालात नमूद केली आहे.
काश्मीरच्या अधिकाऱ्यांकडून अमित शहांनी राज्याचा विस्तृत आढावा घेतला होता. संवेदनशील राज्याची सद्यपरिस्थितीची नेमकी जाणीव करून दिली. अधिकाऱ्यांनी अमित शहांना वार्षिक अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची माहिती दिली. शहा लवकरच राज्याचा दौरा करतील असेही अधिकाऱ्यांनी म्हटले.