आंबेठाण – चाऱ्याच्या शोधार्थ आंबेठाण (ता. खेड) परिसरात आलेले मेंढपाळ पाऊस कोसळत असल्याने परत मूळ गावाकडे निघाले आहेत. दरवर्षी मेंढपाळ चाऱ्याच्या शोधार्थ गावावरून पायी मेंढ्या व बकऱ्या घेऊन या भागात येत असतात. आता पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
पूर्ण हिवाळा व उन्हाळा ही धनगर लोक घरापासून 8 महिने दूर राहून पशुधन जपण्याच्या प्रयत्न करतात. अत्यंत खडतर प्रवास आणि रानावनात मुक्काम करीत प्रतिकूल परिस्थिती मेंढपाळ मेंढ्या व बकऱ्या सांभाळत आहेत. बऱ्याच वेळ जंगली प्राण्याचा हल्ला होतो. त्यात मेंढ्या व बकऱ्या मारल्या जातात तरी कधी मेंढपाळ ही जखमी होतात. आता या समाजातील नागरिकांकडे मोबाइल व दुचाकी ही दिसू लागल्या आहे. त्याचप्रमाणे रात्री उजेडासाठी सोलर दिवा ही वापरताना दिसून येत आहे. पाऊस संपल्यावर यांचा पुन्हा हाच प्रवास उलट सुरू झाला असून वर्षांनूवर्ष आणि पिढ्यान् पिढ्या सुरूच आहे.