मुंबई – सर्व क्षेत्रांमध्ये आता डिजीटल व्यवहारांना प्राध्यानरू देण्यात येत असताना दुसरीकडे सायबर भामट्यांच्या फसवणुकीच्या नवनवीन पद्धती समोर येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडून आता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष केले जात आहे. मुंबईत एका केंद्रीय निवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगाराकडून तब्बल दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
एक 60 वर्षीय माजी वरिष्ठ सरकारी अधिकारी सायबर फसवणूक टोळीच्या आमिषाला बळी पडून त्यांची 1.14 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ते काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. या प्रकरणी पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवला आहे.
तक्रारदार हे अणुशक्ती नगरचे रहिवासी आहेत. काही महिन्यांपूर्वी जवळपास नऊ सदस्यांच्या सायबर फसवणूक गटाने केंद्र सरकारच्या कर्मचारी विमा योजनेच्या (सीजीईआयएस) विविध विभागांमधून कर्मचारी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी स्वतःला विमा योजनेचा एक्झिक्युटिव्ह भासवले.
तसेच आपण शासकीय विमा योजनेत 4 लाख रुपयांचे प्रीमियम भरण्यात अपयशी ठरले आहात, ज्यामध्ये सदर विमाची रक्कम परिपक्वता झाल्यास त्यात कोट्यवधी रुपये तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर चांगला बोनसही मिळेल, असे आमिष दाखवले.
तसेच जर पैसे भरले नाहीत तर तुमची पॉलिसी रद्द होईल. तसेच जमा केलेले पैसे सुद्धा लेप्स होणार, असे सांगत सायबर भामट्यांनी संबंधित व्यक्तीकडून कधी प्रोसेस फीस, तर कधी टॅक्स, तर कधी दंडाच्या नावावर जवळपास 1 कोटी 14 लाख रुपए जमा करुन घेतले आहे. या प्रकरणी सायबर सेलने गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.