कोल्हापूर: जिल्ह्यामधील आपत्तीत सापडलेल्या विशेषत: शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाबाबत असणाऱ्या कर्जाची पुनर्गठण करावे. त्याचबरोबर नवीन कर्जाला सहानुभूतीपूर्वक पात्र ठरवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात विशेष जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रबंधक नितीन देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय प्रबंधक किशोर कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, नाबार्डचे नंदू नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने आदी उपस्थित होते.