मुंबई – आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील असे नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांना लागू होत नाहीत, ज्यांना महासंचलनालयाने मंजूरी दिली आहे आणि ज्या देशांसोबत भारताने एअर बबल व्यवस्था केली आहे अशा देशांतील उड्डाणे, सुरू राहतील.
यापूर्वी, डीजीसीएने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मागे घेत 31 जानेवारी 2022 पर्यंत बंदी वाढवली होती. देशात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत 2,82,970 नवीन करोनाबाधितांसह 441 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ नोंदवण्यात आली.