नवी दिल्ली – करोना रुग्ण वाढत असल्यामुळे बऱ्याच राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याचा घर विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतमध्ये तिमाही पातळीवर घर विक्री 23 टक्क्यांनी कमी झाली आहे. जेएलएल इंडिया या संस्थेने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, एप्रिल ते जून या काळात देशभरातील सात मोठ्या शहरात 19,635 घरांची विक्री झाली.
जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये 25,583 घरांची विक्री झाली होती. तिमाही पातळीवर गाड्यांच्या विक्रीत घट झाली असली तरी वार्षीक पातळीवर मात्र या सात शहरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये 83 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते जून या काळात केवळ 10,753 घरांची विक्री झाली होती. त्या काळात भारतामध्ये कडक लॉक डाऊन करण्यात आले होते. त्यामुळे घर विक्रीवर परिणाम झाला होता. आता जून महिन्यानंतर बऱ्याच शहरांमधील निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये घरांची विक्री वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत बंगळुरूमधील घर विक्री 47 टक्क्यांनी वाढली आहे. चेन्नईतील घर विक्री 81 टक्क्यांनी कमी झाली आहे. दिल्लीतील घर विक्री 55 टक्क्यांनी टक्क्यांनी कमी झाली आहे. कोलकत्ता शहरातील घर विक्री 56 टक्क्यांनी कमी झाली आहे. या कालावधीत पुणे शहरातील घर विक्रीचा 6 टक्क्यांनी कमी होऊन 3,539 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी पुणे शहरात एप्रिल ते जून या काळात 3,745 घरांची विक्री झाली होती असे या संस्थेने म्हटले आहे.