बाळासाहेबांची शिवसेना गटाची विद्युत वितरणकडे मागणी
शिक्रापूर : सध्या शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी राहत असताना विद्युत वितरण विभागाकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तातडीने पूर्ववत करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना गटाने विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत केली आहे.
उपकार्यकारी अभियंता कार्यालयात आज बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद, शिरुर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, उप तालुका प्रमुख संतोष वर्पे, शिवाजी नवले, शरद नवले संपत कापरे, तेजस फलके, गणेश कोतवाल, आनंदा हजारे, रोहिदास शिवले, बापूसाहेब मासळकर, सागर दरेकर, युवा सेना सोशल मिडीया तालुका प्रमुख मोहन घोलप, युवा सेना जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, हरिदास डफळ, सत्यवान पावसे, दत्तात्रय गिलबिले, ज्ञानेश्वर फराटे, यांसह आदी उपस्थित होते.
यापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कोणतेही पिक घेता आलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही उत्पन्न मिळालेले नाही; सध्या शेतात पिके उभी राहत असताना कोणतीही पूर्व कल्पना न देता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयास पाठवून त्यांच्या भावना मांडण्यात येणार आहे; मात्र शेतकऱ्यांनी देखील वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
-नितीन महाजन, उपकार्यकारी अभियंता