नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या तबलिगीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग वाढण्यास तबलिगी कार्क्रम जबाबदार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होतं असल्याचे निरीक्षण मंत्रालयाने नोंदवले आहे.
दरम्यान, देशात कोरोना बाधितांचा आकडा ३ हजार ३७४ वर पोहचला आहे. तर गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ४७२ रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत ७९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात कोरोनामुळे आज चार जणांचा मृत्यू झाला आहे.