रांजणगावात उद्योजकांशी चर्चा
रांजणगाव गणपती : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार कटीबद्ध राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी केले. रांजणगाव इंडस्ट्रीयल असोसिएशन व भारतीय जनता पार्टी शिरुर बेट मंडल विभागाच्या वतीने सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीसह चाकण, तळेगाव दाभाडे औद्योगिक वसाहतीमधील उद्योगपतींच्या व उद्योगांच्या समस्या समजावून घेऊन केंद्रीय उद्योगमंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे रेणुका सिंह यांनी सांगितले.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर-पाटील, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, शिरुर-आंबेगाव बेट मंडलचे अध्यक्ष सतीश पाचंगे, भाजापा नेते धर्मेंद्र खांडरे, मयुर गावडे, रांजणगाव इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष पी. बी. पालेकर, महेंद्र पाटील, राकेश बावेजा, आर. डी. चौधरी आदी उपस्थित होते.
पुणे – नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना लवकर कराव्यात, अशी मागणी यावेळी रांजणगाव इंडस्ट्रीयल अशोसिएशनच्या वतीने करण्यात आली.