मुंबई – रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विविध पतमानांकन संस्थेच्या प्रमुखांशी चर्चा केली. यावेळी रिझर्व बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पतमानांकन संस्थांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर भारताच्या स्थूूल अर्थव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या आठवड्यामध्ये पतमानांकन संस्थांनी भारताची पत कमी केली आहे.
त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. पतमानांकन कमी केल्यानंतर भारताला कर्ज घेणे अधिक महागात पडते. भारताने या वर्षी अर्थसंकल्पात ठरविल्यापेक्षा 4 लाख कोटी रुपयांचे जास्त कर्ज घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पतमानांकन कमी होऊ नये, यासाठी अर्थमंत्रालय आणि रिझर्व बॅंक प्रयत्नशील आहे.