नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे नागरिकांना विम्याचे संरक्षण मिळणे गरजेचे झाले आहे. ही बाब ध्यानात घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी पॉलिसी लॅप्स झालेल्या पॉलिसीधारकांना या पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याची आणखी एक संधी दिली आहे.
ज्या पॉलीसी धारकांना विविध कारणामुळे वेळेवर प्रीमियम भरता आला नाही आणि त्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली असेल तर अशा ग्राहकांना या योजनेचा लाभ होणार आहे. जुनी पॉलिसी पुनरुज्जीवित करणे नवी पॉलिसी काढण्यापेक्षा केव्हाही फायदेशीर ठरते.
ज्या ग्राहकांची पॉलिसी 7 जानेवारी ते 6 मार्च दरम्यान काही अटीच्या साध्या आधारावर पॉलिसी पुनरुज्जीवित करता येतील.
ज्या ठिकाणी विशेष वैद्यकीय चाचणीची गरज नाही अशा एलआयसीच्या 1,526 कार्यालयातही या पॉलिसींचे पुनरुज्जीवन करता येणार आहे. काही अटी आणि शर्ती च्या आधारावर प्रीमियम न भरलेल्या तारखेपासून पाच वर्षाच्या आतील पॉलिसींचे पुनरुज्जीवन करता येणार आहे.
त्यातील बऱ्याच पॉलिसींचे पुनरुज्जीवन संबंधित ग्राहकाने तो निरोगी असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर आणि करोना संदर्भातील प्रश्नावली भरल्यानंतर करता येऊ शकेल. या अगोदर 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर 2020 दरम्यान अशीच मोहीम एलआयसीने राबविली होती. पॉलिसी पुनरीज्जीवीत करणाऱ्या ग्राहकाला विलंब शुल्कात 20% सूट देण्यात येईल. एलआयसीचे देशभरात सध्या 30 कोटी पॉलिसीधारक आहेत.