पुणे – वैद्यकीय व दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले असून राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करण्यासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा. अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केली.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या परीक्षा प्रक्रियेला मराठा आरक्षणाचा कायदा लागू न करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परिणामी, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेतलेल्या 213 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या पाठिशी “अभाविप’ आहे.
राज्य सरकारकडे वैद्यकीय व दंतवैद्यक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा. शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर अध्यादेश काढावा. त्याद्वारे विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करताना त्यांचे होणारे मानसिक व शारीरिक नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही संघटनेने मागणी केली आहे.