श्रीनगर – जम्मू-काश्मीर राज्याला प्रदान करण्यात आलेल्या विशेष राज्याच्या दर्जाचे जोरदार समर्थन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज पुन्हा केले आहे. जम्मू-काश्मीर राज्याला असलेले कलम ३७० काढून घेतल्यास राज्यात बळजबरीची सत्ता होईल असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हंटले आहे. पुढे बोलताना मेहबुबा मुफ्ती यांनी ज्याप्रमाणे पॅलेस्टाईन वर इजरायलचा कब्जा आहे त्याप्रमाणेच जम्मू-काश्मीर मध्ये विशेष राज्याचा दर्जा काढल्यास, भारताचा कब्जा होईल असे त्या म्हणाल्या.
M Mufti: Amit Shah sahab, Mehbooba Mufti aap se keh rahi hai, jis din aap 370 ko khatam karoge, you will be an occupational force in Jammu & Kashmir, jis tarah Palestine pe Israel ka kabza hai usi tarah Jammu&Kashmir main Hindustan ka kabza hoga, agar aapne 370 ko khatam kiya. pic.twitter.com/wnYIWWYWzk
— ANI (@ANI) April 4, 2019
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत अनुकूलता दर्शवणारी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी नुकतीच मांडली होती. त्यावरून मेहबुबा यांनी जेटली यांच्यावर पलटवार केला होता. जम्मू-काश्मीरला राज्यघटनेच्या ३७० व्या कलमांतर्गत विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. ते कलम म्हणजे भारत आणि जम्मू-काश्मीरमधील पूल आहे. ते कलम रद्द करण्यात आल्यास भारताबरोबर राहण्याचा फेरविचार राज्याला करावा लागेल, तसेच हा दर्जा काढून घेतल्यास जम्मू-काश्मीरचे भारताबरोबरचे संबंध संपुष्टात येतील, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते.