मुंबई – राज्यातील 25 गड आणि किल्ल्यावर राज्यशासनाने हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर गडप्रेमींकडून टीका होत आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा, आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले आहे. याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर, असा इशाराही धनंजय मुंडेंनी सरकारला दिला.
शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा, आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले आहे. याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर… pic.twitter.com/rxNLbEgEQM
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 6, 2019
#व्हिडीओ : सरकारच डोक ठिकाणावर आहे का – डॉ . कोल्हे
दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या @CMOMaharashtra
आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे.— Supriya Sule (@supriya_sule) September 6, 2019
राज्य विकायला निघालेत फडणवीस आणि साथीदार. गड किल्ले भाड्याने देतायत. लाज वाटली पाहिजे असा निर्णय घेताना.
काँग्रेस हा निर्णय राबवू देणार तर नाहीच पण दोन महिन्यात आमचं सरकार आलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय कच-याच्या डब्यात टाकू pic.twitter.com/A64ijFEft0
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 6, 2019