धनंजय मुंडे यांचा महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना इशारा
मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरूणीच्या मृत्यूनंतर राज्यात संपुर्णपणे संतापाचे वातावरण निर्माण झाला आहे. त्यातच राजकीय नेत्यांनीदेखील या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी स्त्रियांवर अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या इशारावजा दम दिला आहे.
हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे.क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 10, 2020
गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती सोमवारी सकाळी 6.55 मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेने सकाळी अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेत्यांसोबत कलाविश्वातूनही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्षात ठेवा, क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही असा सज्जड दम अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला ट्विटरवरून दिला आहे
हिंगणघाटमधील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक तरुणीवर उपचार करत होते. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे. क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.