कोलकाता: पश्चिम बंगालमधील सर्व धार्मिक स्थळे 1 जूनपासून उघडली जातील. तथापि, एकावेळी केवळ 10 लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाईल. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपेल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हि माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, चहा आणि जूट उद्योगही 1 जूनपासून 100 टक्के कामगारांसह उघडतील. सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये देखील पूर्ण क्षमतेने उघडली जातील. पश्चिम बंगालमध्ये गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यात यश आले आहे. बाहेरून लोक येत असल्याने आता ही प्रकरणे वाढत आहेत.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 25 मार्चपासून अंमलात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून देशभरातील धार्मिक स्थाने बंद आहेत. त्यानंतर या लॉकडाऊनला आणखी तीन टप्प्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आणि यामध्ये मंदिर उघडण्यावर बंदी देखील कायम आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि 31 मेनंतर लॉकडाऊन वाढविण्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले. 31 मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपुष्टात येत आहे. आणि त्यापूर्वी गृहमंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला. यावेळी पुढच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी 25 मार्चला प्रथम देशव्यापी लॉकडाउन करण्यात आला आणि त्यानंतर त्यास तीन वेळा वाढविण्यात आले.