राज्य सरकार पीएमसी बॅंक राज्य सहकारी बॅंकेत विलीन करणार
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील घोटाळ्याने बॅंकेच्या खातेधारकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आता हे नुकसान भरून काढण्यासाठी पीएमसी बॅंक महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. पीएमसी बॅंकेतील खातेधारकांना न्याय मिळावा यासाठी पीएमसी बॅंकेचे राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरज भासल्यास विलीनीकरणाबाबत राज्य सरकार रिझर्व्ह बॅंकेशीही चर्चा करेल, असे पाटील यांनी म्हटले आहेत.
Jayant Patil, NCP leader and Maharashtra Minister: Depositors of Punjab & Maharashtra Co-operative (PMC) Bank will get relief if the bank is merged with Maharashtra State Cooperative Bank.We’re working on it.If need arises, we’ll write to Reserve Bank of India to merge the banks. pic.twitter.com/z44gB2nIH8
— ANI (@ANI) December 5, 2019
पीएमसी बॅंक प्रकरणाबद्दल जयंत पाटील यांनी नुकती माहिती दिली आहे. या बॅंकेतील खातेधारकांनी चिंता करण्याची कोणतीच गरज नाही. सरकार तुमच्या पाठिशी आहे. खातेधारकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासंदर्भात राज्य सहकारी बॅंकेच्या अध्यक्षांशी चर्चा केल्याची माहिती जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पीएमसी बॅंकेतील हजारो खातेधारकांना दिलासा देण्यासाठी विलीनीकरणाबाबतचा निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे, असेही राज्य सहकारी बॅंकेच्या अध्यक्षांना सांगितल्याची माहिती देखील जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
पीएमसी बॅंकेतील 4 हजार 355 कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर या बॅंकेत खाते असणारा सामान्य माणून हवालदिल झाला आहे. आयुष्यभराची कमाई या बॅंकेत अडकून असल्याने काही खातेधारकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पीएमसी बॅंक घोटाळा समोर आल्यापासून खातेधारकांना आपल्या खात्यातून पैस काढण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. सध्याच्या घडीला पीएमसी बॅंकचा कारभार हा रिझर्व्ह बॅंकेच्या प्रशासना अंतर्गत सुरु आहे. पीएमसी बॅंक 11 हजार 600 कोटी रुपये जमा असलेली देशातील 10 प्रमुख सहकारी बॅंकापैकी एक आहे.