नवी दिल्ली – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना स्वगृही जाण्याची सशर्त परवानगी गृहमंत्रालयाने दिली आहे. यानुसार हैद्राबाद ते झारखंड या मार्गावर आज सकाळी पहिली ट्रेन धावली. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारनेही महाराष्ट्रातून रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
बिहारमधील मंत्री संजय झा यांनी म्हंटले कि, स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या राज्यामध्ये अडकून पडले आहेत. आम्ही केंद्राकडे विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी केली आहे. बसमधून या लोकांना आणण्याचा विचार केल्यास रेल्वेच्या केवळ एक एक तृतीयांश लोकांइतकीच बसची क्षमता असते. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर अनेक ठिकाणी बिहारमधील लोक अडकून पडली आहेत. त्यांना सुरक्षित परत आणणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
There is a large no.of migrant workers & students. We’ve requested centre for a special train. If buses are used it’ll be able to ply only on 1/3rd capacity. People are in Maharashtra, Tamil Nadu & other places. It’s important to bring them back safely: Sanjay Jha, Bihar Minister pic.twitter.com/o80POUsrEO
— ANI (@ANI) May 1, 2020
दरम्यान, अडकलेले कामगार विद्यार्थी लोकांना स्वगृही पाठवण्याच्या दृष्टीने गृहमंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसारच पहाटे ५ च्या सुमारात तेलंगणाच्या लिंगमपल्ली येथून रांचीला एक ट्रेन रवाना झाली. २४ डब्ब्याच्या ट्रेनमधून जवळजवळ १२०० लोकांना आपल्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. तर, ट्रेनमधील प्रवाश्यांना क्वारंटाइन पाळण्याची सक्ती करण्यात आली होती.