पुणे – नाचण्यास नकार दिल्याने तिघा तरुणांना चार ते पाच जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली. ऍन्थेनी अलोक संतेया (30, आंबेडकर भवनजवळ), अक्षय दिलीप चकणे (25, रा.कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी नंदु भगवानसिंग (22) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवार पेठेत घडली. यातील एका आरोपीचे दुकान आहे. तर फिर्यादी व त्याचा मित्र डोसा सेंटरच्या गाडीवर कामाला आहेत. घटनेच्या दिवशी आरोपीने त्याच्या मित्रांना दुकानात बोलावून घेतले होते. चौघेही रात्री दुकानात दारु पित बसले होते. दरम्यान, फिर्यादी त्याचा भाऊ आणि मित्र असे तिघे काम संपल्यावर घरी चालले होते. आरोपींनी त्यांना बोलावून घेत नाचण्यास सांगितले. मात्र, तिघांनीही नाचण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्याद राहत असलेल्या गाळ्यात जाऊन त्यांना मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस फौजदार करवंदे करत आहेत.