हैद्राबाद – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची सुरक्षा कमी करण्यात आली असून त्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागणूक देण्यात येत आहे.
विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच, त्यांना विमानापर्यंत देण्यात येणाऱ्या व्हीआयपी सुविधेपासून वंचित ठेवत त्यांना बसमधून प्रवास करावा लागला. याप्रकरणी टीडीपीने नाराजी व्यक्त केली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत अशाप्रकारे व्यवहार करणे चुकीचे आहे. भाजपा आणि वायएसआर कॉंग्रेस पार्टी सुडाचे राजकारण करत आहे, असा आरोप टीडीपीने केला आहे.