संयुक्तराष्ट्रे – भारत आणि चीन या दोन देशांनी संवादातून आपल्या सीमावर्ती प्रांतात निर्माण झालेला तणाव कमी करावा अशी सुचना संयुक्तराष्ट्रांच्या प्रमुखांनी या दोन्ही देशांना केली आहे. दोन्ही देशांमध्ये अलिकडेच उत्तर सिक्कीम भागात नव्याने लष्करी संघर्ष उद्भवला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही सुचना केली आहे. दोन्ही देशांच्या लष्करामध्ये 20 जानेवारीला मोठा संघर्ष उद्भवला होता.
संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दोन्ही देशांमध्ये मोठी सीमा आहे आणि तेथील वाद गेल्या अनेक दिवसांपासून अस्त्विात आहे. आपसातील संवाद वाढवूनच नव्याने निर्माण झालेला तणाव कमी करता येईल असे त्यांनी म्हटले आहे. उत्तर सिक्कीम सीमा भागात निर्माण झालेल्या संघर्षाबाबत संयुक्तराष्ट्रांची काय भूमिका आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.