मुंबई – अखेर राज्यात नोकरभरतीला सुरूवात झाली आहे. शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडी सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने नोकरभरती प्रक्रियेला सुरूवात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. अखेर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणत्या विभागात किती पदांवर भरती.
📌 महत्वाचे
महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या सरकारने आणलेल्या 'महापोर्टल' प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या. याच सोबत विद्यार्थ्यांच्या असंख्य तक्रारी लक्षात घेत महाविकासआघाडी सरकारने तात्काळ या प्रणालीला स्थगिती दिली होती. pic.twitter.com/wSY9P3VHMB
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 23, 2021
महाभरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजार 297 जागांसाठी भरती होणार असून या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 231 पदांसाठी भरती होणार आहे. तर आरोग्य विभाग आणि गृह विभाग अशी तब्बल 13 हजार 800 पदांची पहिल्या टप्प्यांत भरती होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीला आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया राज्यात एकाच वेळी होणार आहे. मराठा समाजाच्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या अर्जदारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून नव्याने प्रमाणपत्र घेऊन पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.