मुंबई – राज्यात सध्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची भरती होते. मात्र, यात सतत तांत्रीक अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढे शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने कुठल्याही तांत्रिक अडचणीशिवाय पार पडण्यासाठी एमपीएससीसारख्या अनुभवी संस्थेने काम करावे त्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत. एमपीएससीमार्फत शिक्षक भरती करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
राज्यातील शिक्षक भरती ही एमपीएससीमार्फत घेतली जावी, अशा प्रकारचा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तलायकडून शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावासंदर्भात शिक्षण सचिव, एमपीएससीसुद्धा सकारात्मक असल्याची माहिती आहे. मात्र, भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करण्यासाठी नियमांमध्ये, शिवाय काही तांत्रिक बदल करणे गरजेचे आहे.
राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली नेमणूक अवैध; खासदार विनायक राऊत म्हणाले…
नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जी शिक्षक भरती सुरू आहे ती पूर्ण होईल, अस शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळातील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जाणार आहे.
Monkeypox | मंकीपॉक्सचा उद्रेक, जगभरात 14 हजार रुग्ण तर ‘या’ देशात 5 जणांचा मृत्यू