पुणे – आरोग्य विभागातील सुमारे 3 हजार पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत अनेक गैरप्रकार निदर्शनास आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे.
त्यामुळे ही परीक्षा रद्द करून नव्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
रविवारी झालेल्या परीक्षेत राज्यातील विविध भागात बैठक व्यवस्था चुकीची होती, तर सामूहिक कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.
एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, महेश घरबुडे, पद्माकर होळंबे, नीलेश गायकवाड यांनी याबाबत मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्र लिहित ही मागणी केली आहे.