नाशिक – राज्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अन्न नागरी पुरवठा विभागाने विक्रमी अन्नधान्य वाटप केले आहे. एप्रिल महिन्यात 68 लाख 13 हजार क्विंटल, मे महिन्यात 76 लाख 83 हजार क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले आहे तर 1 एप्रिल ते 5 जूनपर्यंत 62 लाख 84 हजार 413 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
भुजबळ म्हणाले, सामान्य परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः 35 लाख क्विंटल धान्य वितरित केले जाते. मात्र एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या 31 लाख 51 हजार क्विंटल मोफत तांदूळ वाटपामुळे दुप्पट म्हणजे 68 लक्ष 13 हजार क्विंटल अन्नधान्य वाटप केले आहे.
मे आणि जूनमध्ये केशरी कार्डधारकांना देखील अतिरिक्त 1 लाख 50 हजार क्विंटल धान्य वाटप जात असल्याने मे महिन्यात 76 लक्ष 83 हजार क्विंटल धान्य वितरित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.