मुंबई – संपूर्ण जगासह देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही करोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 33 हजार 470 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 हजार 671 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून करोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे.
दुसरीकडे राज्यात आज 31 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत एकूण 1247 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 467 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. तसेच दिवसभरात 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 2 हजार 259 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 66 लाख 2 हजार 103 रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के आहे.