मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय संकट जसजसे गडद होत चालले आहे, तसतशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढत आहे. बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे पाहून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.
रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवणार असल्याच्या चर्चा आहेत. तर अशातच दुसरीकडे मुंबईच्या महापौर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासंदर्बात एक मोठा दावा केला आहे.
माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’ बंडखोर आमदारांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या संपर्कात आहेत. आणि मदत मागत आहे. श्मी यांच्याकडे बंडखोर आमदारांच्या पत्नींनी आपल्या पतीला पुन्हा राज्यात घेऊन येण्यासंदर्भात मदत करावी अशी मागणी केल्याचा दावा पेडणेकर यांनी केलाय.’
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना नेत्यांसोबत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला आणि निवडणूक आयोगाला (EC) आवाहन करण्यात आले की, शिवसेना आणि त्यांचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्यापासून इतर कोणत्याही राजकीय संघटना किंवा गटाला थांबवावे.