लखनौ – देशात करोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र असे असले तरी देशावर तिसऱ्या लाटेचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे या धोक्याच्या अगोदरच प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. त्यासाठी देशाचे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र अजूनही देशाच्या दुर्गम भागात लसीकरणाच्या म्हणाव्या तशा सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याचे दिसत आहे. याचे जिवंत उदाहरण सध्या झारखंडमधून समोर येत आहे.
Villagers get vaccinated in #flood affected areas of #Muzaffarpur district at #टीकावालीनाव launched by @DM_Muzaffarpur@MoHFW_INDIA @BiharHealthDept pic.twitter.com/6b9s0rmAa6
— PIB In Bihar 🇮🇳 Mask yourself 😷 (@PIB_Patna) July 9, 2021
देशातील दुर्गम भागांमध्ये जाऊन आरोग्य कर्मचारी लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी डोंगराळ तर काही ठिकाणी बर्फाळ प्रदेशात आरोग्य कर्मचारी अथक प्रयत्न करून पोहचत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सध्या अशाच एका आरोग्य विभागातील कर्मचारीही कसोशीने प्रयत्न करत आहेत. मुझफ्फरनगरमधील असाच एक प्रयत्न अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या परिसरात पहिल्या टप्पात दोन टीका करण्यासाठी टिकवाली नाव तयार करण्यात आली या बाबत स्थानिक अधिकारी सांगितले की,’प्रत्येक नावेत दोन एएनएम, दोन गोताखोर आणि नाविक असणार आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून ही नावेतील लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कटरा येथील 14 ग्रामपंचायतींच्या पूरग्रस्त भागात नावेतून जाऊन येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामुळे लसीकरणाला वेग येईल तसेच या भागात संपूर्ण लसीकरण होणार आहे.