मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने काल बहुमत सिद्ध केले. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याच पार्श्व्भूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सभागृहाचे नेते म्हणून विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचे अभिनंदन केले.
दरम्यान , बच्चू कडू यांनी यानंतर वृत्तमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, ‘सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, पुढचे सहा महिने मंत्री, आमदार, आणि वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका, ती मदत शेतकऱ्यांना द्या. अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.