मुंबई – कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलानंतर आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ९० च्या दशकात रामायण ही मालिका दूरचित्रवाहिनीवर खूप गाजली होती. याच मालिका डीडी नॅशनल वाहिनीवर ‘महाभारत’, ‘रमायण’, ‘ब्योमकेश बक्शी’ अशा सर्व लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या.
दरम्यान, आता रामायण मालिकेनंतर आणखी एक मालिका पुन्हा दाखवली जावी अशी मागणी सोशल मीडियाद्वारे लोक करत आहे. अभिनेता मुकेश खन्नाची मुख्य भूमिका असलेला ‘शक्तिमान’ हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
शक्तिमान ही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक गाजलेली मालिका आहे. आठवड्यातून केवळ एकदाच प्रदर्शित होणारी ही मालिका जवळपास १२ वर्ष टिव्हीवर सुरु होती. या मालिकेचा शेवटचा भाग २००५ साली पोगो वाहिनीवर प्रदर्शित झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी शेवटच्या भागापर्यंत शक्तिमानच्या टीआरपीमध्ये घट झाली नाही. परंतु काही आर्थिक मतभेदांमुळे ही मालिका बंद करण्यात आली. मात्र लॉकडाउनच्या निमित्ताने शक्तिमान आता पुन्हा एकदा टीव्हीवर परतला आहे.