नवी दिल्ली/श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर बहुतेक भागात कलम १४४ लागू आहे. शुक्रवारी नमाज होण्यापूर्वी घाटी व संपूर्ण काश्मीरमध्ये कलम १४४ मध्ये शिथिलता होती, परंतु पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये गर्दी जमविणे थांबविण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस त्या भागात फिरत आहेत आणि लोकांना घरात राहण्याचे निर्देश देत आहेत. तसेच पोलिस दुकानदारांना दुकान बंद करण्याचे आवाहन करीत आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती शांत आहे आणि राज्यात कोठेही हिंसाचार झाला नाही.
राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले, ‘कश्मीरमध्ये किरकोळ दगडफेक झाल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. ती घटना त्वरित हाताळली गेली आणि तिथेच थांबली.’ त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांनी लोकांना बनावट बातम्यांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती केली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर डीजीपींनी हे स्पष्टीकरण दिले. राहुल गांधींनी काश्मीरमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काही मिनिटांनंतर ‘परिस्थिती शांततापूर्ण आहे’ असे ट्विट श्रीनगर पोलिसांनी केले.