नवी दिल्ली – रिझर्व बॅंकेने व्याजदरात मोठी वाढ केल्यानंतर शेअर बाजाराचे निर्देशांक सव्वा दोन टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य एकाच दिवसात 6.27 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
आता शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित भांडवली मूल्य 259 लाख कोटी रुपयांवर आले आहे. रिझर्व बॅंकेने केलेल्या व्याजदर वाढीमुळे वाहन, घर इत्यादीसाठी घेतलेल्या कर्जावरील हप्त्याची रक्कम वाढणार आहे.
आज शेअर बाजारात झालेल्या तुफान विक्रीमुळे मुख्य निर्देशांकाशी संबंधित मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. त्याचबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 2.63 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 2.11 टक्क्यांनी कोसळला.
व्याजदराशी संबंधित सर्व क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात बुधवारी घट नोंदली गेली. क्षेत्राचा निर्देशांक चार टक्क्यांनी, क्षेत्राचा निर्देशांक साडेतीन टक्क्यांनी, क्षेत्राचा निर्देशांक तीन टक्क्यांनी तर दूरसंचार क्षेत्राचा निर्देशांकात तीन टक्क्यांनी कोसळल्याचे दिसून आले.