नवी दिल्ली – हरिकेन डोरियन चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेल्या बहामासला भारताकडून मानवतावादी दृष्टीकोनातून 10 लाख डॉलरचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ही माहीती दिली. या आपत्तीच्यावेळी भारत बहामासच्या मदतीसाठीची बांधिलकी जपत आहे, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
बहामासमध्ये हरिकेन डोनियरमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. या अवघड प्रसंगी बहामासमधील नागरिकांना भारताकडून मदत केली जाईल. त्यासाठी 10 लाख डॉलरची तातडीची मदत केली ज्त् आहे, असे रवीश कुमऱ् यंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आतापर्यंत बहामासमध्ये या चक्रिवादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या 40 झाली आहे. पूराचे पाणी ओसरू लागले आहे. तसेच पडलेल्या इमारतींचे ढिगारे उलसले जाऊ लागल्यामुळे आता मदत आणि बचावकार्याला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.